शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

आवर्तन


ती येण्याचे काळ-ऋतू नि येतानाच्या लाटा,
कधी हरवत, कधी सापडणाऱ्या हरवलेल्या वाटा;
सुळकत जाणारे किरमिजी पक्षी पाण्याकडे,
परतून माघारी-माघारी पुन्हा परत, डोळे वाटेकडे!
धुळेजलेल्या वाटांवरून एकटीच पळणारी फुलपाखरं,
त्यामागून नि एक सावली पळतीय खरं…
अशा नाजूक वेळी किती घडावीत आवर्तनं,
भेट-ताटातूट, पुन्हा परत सारंच जीवघेणं!