बुधवार, ९ जून, २०१०

हत्तीणबाईंची quest

पाखरानं कसं भिरभिरायचं, फिरायचं, मजेत उंडारायचं नि मनात आलं तर कुठल्याशा फांदीवर क्षणभर विसावायचं...मग परत भिरभिरायचं! पण एकदा किनई गंमतच झाली, चिंगीच्या बागेत धावपळ झाली! हत्तीणबाईच्या पोटात मळमळ झाली! आता मळमळ म्हणजे सोप्पी का ती? हत्तीण बाईंचं पोट लागलं की ओरडू आणि दुर्वा दिल्या, नारळं दिली; तरी काही शांतच होईना मुळी! मग आता उपाय काय यावर? चिंगी लागली विचार करू…गेली घुबड आजोबांकडे म्हटली, “चहत्तीणताईंच्या चोपोटात चुदुखूच चालागलंय चाफार! चाकाय चुउपाय चकरावा?” घुबड आजोबा कुठले ऐकायला? ऐकायला उठायला नको झोपेतून. आणि उठले तरी कानांतले वॉकमनचे गोळे काढणार कोण? चिंगी बघत बसली घुबड आजोबांकडे. घुबड आजोबा हलले नाहीत की डुलले नाहीत, मुळात काहीच काही बोलले नाहीत! “छे! असले कसले हो आजोबा तुम्ही?” चिंगीच्या मनात हा विचार आला खरा, पण करणार काय? हत्तीणबाई तर गडाबडा लोळू लागल्या नि नंतर-नंतर तर जोरजोरात चित्कारू लागल्या; हत्तीदादाची पंचाईतच किनई! त्या नकट्या नाकांच्या वटवाघळांनी तर बिबट्या-फुकट्या पोलीसांनाच आणलं नि F.I.R. फाईल केला झोपमोड केली म्हणून हत्तीदादांच्या विरोधात! आता मात्र चिंगी चिडली. घुबड आजोबांच्या कानांतले बोळे काढून त्यात ती जोरात किंचाळली. घुबड आजोबा खडबडून जागे झाले नि घाबरून दुसऱ्याच झाडावर जाऊन बसले; मान इकडं-तिकडं फिरवत डुलक्या घेऊ लागले. तेवढ्यात चिंगीनं आजोबांना सगळा प्रकार सांगितला… “चाकाय चुउपाय चकरावा?” घुबड आजोबा पण पडले संभ्रमात. असे कधी पुर्वी घडलेच नाही!

घुबड आजोबांनीही समोर घडणारा प्रकार पाहिला. हत्तीणबाईंची जीभ बघितली, कान तपासले, नाडी तपासली…पण काही थांग नाही. पोट तर भरधाव धावणाऱ्या मोटारसायकलीसारखं आवाज करत होतं. घुबड आजोबा पण घाबरले, त्यांनी त्यांच्या खापरपणजोबांनाही consult केलं आणि मग येऊन म्हटले, “उपाय आहे यावर एक. पण तो तोड मिळणं अवघडंय!”
चिंगी म्हटली, “चांसांगा, चपटकन चासांगाना!”
आजोबा म्हटले, “शोधा असे पाखरू, जे रूसलंय फार, आणि का कुणास ठाऊक विसरून गेलंय उडणं-फिरणं; अगदीच शांतही नाही, त्रागा करत बसलंय गप्पगार! त्या पाखराच्या नाकावर एक लाल टिकली रागाची, त्या टिकलीनेच शांत होईल भूक हत्तीणबाईंची!”

चाआता चुकुठे चिमिळेल चेते चापाखरू चीकी चाकाय चोहोणार चुपुढे?

(अशाच एका चिंगीला)
;-)

रविवार, ६ जून, २०१०

सुजलाम सुफलाम, सगळंच लुटलाम!!

मी सध्या या Conferences ला वैतागलोय! या conferences म्हणजे वैतागवाडी. अन्न-धान्याची, पैशाची प्रचंड नासाडी! तीन दिवस conference होती, बंगळूरात. पहिला दिवस आनंदात गेला. इकडे-तिकडे भटकत राहिलो; खेड्याची पोरं पिराच्या उरसात बोंबलत फिरतात तसा! याच्याकडे जा (biocon, eppendorf etc.); त्याच्याकडे जा; याच्या खोड्या काढ; त्याच्या खोड्या काढ. माकडचेष्टा सगळ्या. कामधंदे तर काही नाहीत; फुकटची उठाठेव. जे काम करायला तिथे गेलो होते; त्यातला स्वत:चा interest तर कधीचाच फिक्कट झालेला; नि मी केलेलं काम इतरांना सांगणं हे मला कपडे धुवायच्या पावडरी विकणाऱ्या salesman पेक्षा जास्त काही thrilling वाटलं नाही. माझ्यासारखेच इतरही काही लोक होते; ज्यांचं काम कपडे धुवायच्या पावडरींइतकही उपयोगाचं नव्हतं; पण बिचारी लोकं dedicatedly आपापल्या poster शेजारी उभी होती हॅलोजन लॅम्पखाली ac मधे! मी तीन दिवस खा-खा-खाल्लं…नि timepass केला. त्यासाठी एवढ्या लांबून (अवघे १६00 कि.मी.) (पुणे-बंगलोर) प्रवास केला. पैसे वाया घालवले; श्रमही! बौद्धिक म्हणाल तर काही increment नाही. एवढं सगळं सुरू असताना, विचार करायला मस्त वेळ मिळाला!

भारतातील biotech industry मधील बरीच प्रतिष्ठित लोकं आली होती. काही foreign delegates होते. त्यांच्या जेवणा-खाण्याची कुत्र्यासारखी सोय केली होती. त्यापैकी आम्हीही Poster author या प्रकारात मोडणारे कुत्रे होतो. एकंदरीतच ती संपन्नता पाहून मन विषण्ण झालं. किती ती अन्नाची नासाडी. प्लास्टिकचे ग्लास, visiting cards, fliers कचरा सगळा. लाईट!! कित्तीतरी लाईट वाया. By the way “Climate change and role of biotech industry” असं एक मोठ्ठं session ही conference वाल्यांनी cover केलं होतं; हे त्या conference नि त्या बिचाऱ्या conference चं दुर्दैव! भर उन्हाळ्यात असल्या conferences हव्यातच कशाला? इथे इतकी पाण्याची, लाईटची बोंब असताना; कशाला दुष्काळात तेरावा महिना! माझे हे उद्वेग फक्त या particular conference पुरते मर्यादित नसून ते सगळीकडेच apply होतील! उदाहरणच द्यायचं झालं तर आताची कोपनहेगन परिषद. परिषद झाली; गाजावाजा झाला; निष्पन्न काही नाही; कुठल्यातरी groupने म्हणे कोपनहेगन परिषदेमुळे global warming वर कसा लोड पडलाय यावर पेपर लिहायला घेतलाय!! Recently परत त्यात ऎन मे महिन्यात विदर्भ पक्षी मित्र संमेलन झालं! निदान conservationists ने तरी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. उधळपट्टी करायची असली तर मला पैसे द्या यार!! मी काहीतरी चांगलं तरी करेन!! ;-)

मी काही anti conference नाहीये; पण scientific community जर जगाचं future ठरवण्याचं काम करत असेल तर तिला हे सामान्य norms तरी माहिती असलेले बरे! Conference चा उद्देश काय? तर लोकं एकमेकांना भेटावीत; knowledge exchange व्हावं; नविन संशोधन व्हावं, एकंदरीत सगळाच आनंदी आनंद व्हावा! Well…हा सगळाच आनंदीआनंद करायला आपल्याकडे सध्या बरेच पर्याय उपलब्ध आहेत. उदा. Online conference. अशी एक नुकतीच झाली. प्रवास नाही; फुकटंचं चहा-पाणी, सोललेल्या कोंबड्या नि उकडलेले बटाटे नाहीत; बिअर, शॅम्पेन पार्ट्या नाहीत. घरी बसा, इतरांशी गप्पा मारा. झोपा, मजा करा. Contacts वाढवा. कुणावर भार नाही, काही नाही! आपलं कोण ऐकतंय म्हणा? आपण आपलं वरून ऒर्डर आली की पोस्टर प्रिंट करायचं नि conference संपली की, जमिनीवर आंथरूण आडवं व्हायचं. काय माहिती पण स्वत:च्या फ्लेक्सवर झोप चांगली लागते; मी इतरांचेही try केलेत…I guess, I can write a paper on it!


6.06.10