शनिवार, २३ जुलै, २०११


कागदावर एक रेघ ओढायला निमित्त लागत नाही.
पाऊस पडला – तुझी आठवण आली
किंवा तुझी आठवण आली (नि पाऊस पडला!)
इतकंही अमाप होतं.
आभाळातून कोसळणाऱ्या थेंबांचा कैक सेकंदांचाच प्रवास!
गर्भ – जन्म – उत्साह – आनंद – वेग आणि अकस्मात मृत्यु – दफन!
ही सारी गोष्ट जेवढी मी उपभोगतो; तेवढीच क्लेषदायक?
जीव कातरत जाणारी बासरी, निळ्या रात्रीत पागोळ्यांचं पाणी!
दूरदूरवर दिसायला प्रकाश नाही; थंडीला सारायला ऊब नाही!
ऊब नाही, पण खूप घट़्ट आहे तुझ्या आठवणींची मिठी!
गात्र-गात्र थंड करणारी…

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: