पावसात तू कविता होऊन
अंगावर बरसताना,
अतिशय घम्माड झालेलं
मन आणि थरकतं अंग!
हाताला स्पर्शून जाते तू,
न अंगावरचे शहारे पोरके,
का गं असा करते,
काळजाचा भुगा उगा?
सरपटत आलो तुझ्यापाशी
पांगळं घेऊन बेघर मन,
जायबंदी करून स्वत्वाला,
शोधत गंध तुझा!
विषारी ही हाव तुझी
हवीहवीशी का वाटते?
भक्ष्याला भूललीस की
भक्ष्यच झालीस तू?
हा संग नुस्ता, नाही बंध
मी-तू द्रव्य, आणि रात्र
ती ही विरघळणार नि,
अस्ठी उरणार मात्र!
आणि तू-मी वाहत,
झरा-ओढा, मग नदी;
अणू-रेणूही उरून वाहून,
वेळही सोडेल कधी!
पंकज कोपर्डे
०७ जानेवारी २०२६

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा